या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला
या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला
24 ऑक्टोबर रोजी दिवाळी असेल आणि वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 तारखेला होईल. हे आंशिक ग्रहण असून देशात अनेक ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातूनही ते विशेष असेल. यापूर्वी 30 एप्रिलला सूर्यग्रहण झाले होते, मात्र ते देशात दिसले नव्हते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, भारतातून दिसणारे पुढील मोठे सूर्यग्रहण 21 मे 2031 रोजी होणार आहे. जे एक कंकणाकृती ग्रहण असेल. त्याच्या तीन वर्षांनंतर 20 मार्च 2034 रोजी संपूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.
बिर्ला तारांगण, कोलकाता येथील खगोलशास्त्रज्ञ देवी प्रसाद दुआरी सांगतात की, हे ग्रहण देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात अधिक चांगले दिसेल. त्याच वेळी, ते देशाच्या पूर्वेकडील भागात दिसणार नाही कारण त्या ठिकाणी सूर्यास्त झाला असेल. याशिवाय, ही खगोलीय घटना युरोप, उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि पश्चिम आशियाच्या काही भागांमध्येही दिसेल.
श्रीनगर, जम्मू आणि जालंधरमध्ये दिसेल
दुपारी 4.30 वाजता हे ग्रहण पुर्णत्वावर असेल. यावेळी ते देशात दिसण्यास सुरुवात होईल. भारतात हे ग्रहण लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात दिसणार आहे. यापैकी श्रीनगर, जम्मू, जालंधर, अमृतसर, चंदीगड, डेहराडून, हरिद्वार आणि शिमला येथे ते अधिक स्पष्टपणे दिसेल.
तामिळनाडू, कर्नाटक, मुंबई, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, बंगाल आणि बिहारमध्ये काही काळच पण चांगल्या स्थितीतही दिसणार नाही. त्याचबरोबर आसाम, अरुणाचल, मणिपूर, नागालँडमध्ये हे ग्रहण अजिबात दिसणार नाही.
सूर्याचा अर्धा भाग झाकलेला असेल
अमावस्येला, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जवळजवळ एका रेषेत येतात. ज्याला सूर्यग्रहण म्हणतात. 25 ऑक्टोबरलाही सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जवळजवळ सरळ रेषेत असतील. यामुळे काही काळ चंद्र सूर्याला अंशतः झाकून ठेवताना दिसेल, ज्यामुळे आंशिक सूर्यग्रहण होईल. या ग्रहणादरम्यान, भारतातील सूर्याचा 55% भाग चंद्राने व्यापलेला असेल. नवी दिल्लीत, हे ग्रहण संध्याकाळी 04:29 वाजता सुरू होईल आणि सूर्यास्तासह 6:09 वाजता समाप्त होईल.
24 तारखेला दिवाळी आणि 25 तारखेला सूर्यग्रहण
22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला नरक चतुर्दशी साजरी केली जाईल. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी नरक चतुर्दशी तर सायंकाळी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. 25 रोजी अंशत: सूर्यग्रहण असल्याने कोणताही सण होणार नाही. 26 रोजी पाडवा आणि भाऊबीज साजरी होणार आहे.
दिवसभर सुतक राहील, पूजा-पाठ होणार नाही
ही खगोलीय घटना असली तरी धर्माच्या दृष्टिकोनातूनही हे सूर्यग्रहण विशेष असेल. कारण यावेळी ते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पडत आहे. भारतात दुपारी 4 वाजल्यापासून ग्रहण सुरू झाल्यामुळे त्याचे सुतक 12 तास आधी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होईल. त्यामुळे गोवर्धन पूजा 25 ऐवजी 26 ऑक्टोबरला होणार आहे.
ग्रहण काळात मंत्रजप करावा
25 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात अंशतः दिसणार असले तरी त्याचा परिणाम वातावरणावर आणि सर्वसामान्यांवरही होणार आहे. त्यामुळे सुतक काळात आणि ग्रहणाच्या वेळी खबरदारी घ्यावी लागते. सुतक काळात आणि ग्रहण काळात मंदिरे आणि घरांची पूजास्थळे बंद ठेवावीत. मूर्तींना हात लावू नका.
वृद्ध, मुले आणि आजारी लोकांनी ग्रहणाच्या तीन तास आधी जेवून घ्यावे. ग्रहण काळात मंत्रजप, ध्यान आणि कीर्तन करावे. यावेळी दान करावे. ग्रहण संपल्यानंतर पूजेच्या ठिकाणी आणि संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा. नद्यांमध्ये स्नान करण्याचीही परंपरा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत