ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा परिसरात शोककळा पंधरा दिवसात गेले पंचवीशी तील तीन जीव ,तीन कुटुंब उध्वस्त
ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा परिसरात शोककळा पंधरा दिवसात गेले पंचवीशी तील तीन जीव ,तीन कुटुंब उध्वस्त
लेवाजगत न्यूज आमोदा ता. यावल: - येथील रहिवाशी पूजा पाटील , अरुणा तायडे, धीरज चौधरी असे तीन जीव गेल्या पंधरा दिवसात गेल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा गावावर शोककळा पसरली आहे.
पूजा निलेश पाटील या किडनीच्या आजाराने चार महिने झाले आजारी होत्या, त्यांची पती निलेश पाटील हे नाशिक येथील कंपनीमध्ये नोकरीस होते. निलेश चे वडील सुरेश पाटील हे शेतकरी आहे. घरी जेमतेम शेती असल्याने दोन मुलं निलेश यास उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे नोकरीस पाठवले, व त्याचे लग्न लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील पूजाशी लावण्यात आले.पूजाचे आई-वडील हे आधीच मृत्यू पावलेले असून तिला भाऊ व चार बहिणी होत्या भाऊ हे चांगले सासर म्हणून निलेश याच्याशी लग्न लावून दिले होते.
त्यानंतर मुलगा कार्तिक ( वय 4 वर्ष) मुलगी चित्रांशी ( 9 महिने) अशी दोन अपत्य झाली.पण नियती खेळ पूजा हिच्या किडनी फेल झाल्याने निलेश याने लगेच नाशिक येथील सुयश हॉस्पिटल, गुरुजी रुग्णालय येथील ट्रीटमेंट घेऊन सोलापूर येथे सुद्धा दवाखान्यात नेले.नंतर गोदावरी व जळगाव येथील व ग्रामीण रुग्णालयात तिचा मृत्यू पावला.
निलेश याला जेमतेम पगार असल्याने सर्व खर्च न परवडणारा होता. त्यांनी पत्नीला वाचवण्यासाठी नातेवाईकांकडून खर्चासाठी पैसे जमा केले, तसेच पत्नी आजारी असल्याने चार महिने पत्नी बरोबर राहिलेले नोकरी सुद्धा गेली. आता लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच पडली.
तसेच तीस तारखेला धीरज चौधरी याचा सुद्धा एक्सीडेंट मध्ये मृत्यू पावला. त्याची आई लहानपणीच वारल्याने वडील शशिकांत चौधरी यांनी मोलमजुरी करून त्यास आयटीआय पर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यांचा एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांचा सुद्धा म्हातारपणाचा आधार गेला.
आमोदा येथील अरुणा पंकज तायडे ही तरुणी देखील पंधरा दिवस झाले, मृत्यूची झुंज देत होते, तिचा पती पंकज हा छोटीशे किराणा दुकान चालवत होता. व पत्नी अरुणा आरोग्य केंद्रामध्ये गटप्रवर्तक म्हणून कार्यरत होत्या त्यांना सुद्धा मुलगा व मुलगी हे प्राथमिक शिक्षण घेत असून त्यांची उदरनिर्वाह हा दोन्ही जण चालवत होते. पंकज ची आई सुद्धा आजारी असून तिची घरगुती ट्रीटमेंट डॉक्टरांकडून चालू आहे, परंतु नियतीचा खेळ अरुणाचा एक्सीडेंट होऊन शेवटी मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला व आता सर्व जबाबदारी ही पंकज वर पडली.
अशाप्रकारे आमोदा गावावर तीन जीव गेल्याने संपूर्ण गाव इन दिवाळीच्या तोंडावर शोकळेमध्ये पसरले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत