विद्यापीठ परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी त्वरित सोडवा कुलगुरूंना तोषित पाटील यांचे निवेदन
विद्यापीठ परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी त्वरित सोडवा कुलगुरूंना तोषित पाटील यांचे निवेदन
जळगाव प्रतिनिधी-नुकत्याच कवियित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मधील अंतिम वर्षातील नियमित (Regular) व अनुशेष (Backlog) विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत विद्यापीठाकडून सूचना जाहीर झाली होती. सोमवार दि.१२/१०/२०२० रोजी परिक्षांना सुरुवात देखील झाली, परंतु परीक्षा देताना विद्यार्थ्यांना बऱ्याच वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्यामध्ये लॉगइन करताना प्रॉब्लेम होणे, परीक्षा वेळेवर सुरू न होणे अश्या प्रकारच्या अडचणी आहेत विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत या साठी विद्यापीठाने उपाययोजना करून मार्गदर्शक तत्व देखील जाहीर केली होती. या उपाययोजने मध्ये विद्यापीठाकडून प्रत्येक परीक्षाकेंद्रानुसार IT Co-ordinator ची नेमणूक करून त्यांचे संपर्क विद्यार्थ्यांमध्ये प्रकाशित केले होते.
या उपाययोजना करून देखील परीक्षा देताना विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी ना सामोरे जावे लागले आणि बहुतांशी विद्यार्थी IT Co-ordinator शी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांचा संपर्क व्यस्त येऊ लागला, या नंतर विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंग कृती समिती चे जळगाव जिल्हाध्यक्ष तोषिश पाटील यांना संपर्क केला, तोषिश पाटील यांनी सर्व अडचणी जाणून घेऊन विद्यार्थ्यांशी सखोल चर्चा केली व तात्काळ विद्यापीठामध्ये धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या अडचणीची कल्पना संबंधित कुलगुरू डॉ पी डी पाटील व अधिकाऱ्यांना देत त्यांच्याशी येणाऱ्या प्रत्येक अडचणीबाबत सखोल चर्चा केली व निवेदन दिले.
या वेळी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी तोषिश पाटील यांचे कौतुक करत तात्काळ IT Co-ordinator ची संख्या वाढवण्याबाबत आणि इतर येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत