कानपूरमध्ये भाविकांनी भरलेली ट्रॉली उलटली, २७ ठार: उन्नावमध्ये चंद्रिका देवीच्या दर्शनाहून परतत होते, मृतांमध्ये १४ मुले आणि १३ महिलांचा आहे समावेश
कानपूरमध्ये भाविकांनी भरलेली ट्रॉली उलटली, २७ ठार: उन्नावमध्ये चंद्रिका देवीच्या दर्शनाहून परतत होते, मृतांमध्ये १४ मुले आणि १३ महिलांचा आहे समावेश
वृत्तसंस्था कानपूर-मधील घाटमपूर येथील साद पोलिस स्टेशन हद्दीतील भितरगावजवळील तलावात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात ट्रॅक्टर-ट्रॉलीवरील २५ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले. आतापर्यंत १९ मृतदेह काढण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. भाविकांचा आरडाओरडा ऐकून गावातील लोक मदतीसाठी धावले. माहिती मिळताच पोलिसही पोहोचले. पोलिस गावकऱ्यांना वाचवण्यात व्यस्त आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वेग अतिशय वेगवान असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. अनियंत्रित ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात उलटली.
जखमींना भितरगाव सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथून प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना गंभीर स्थितीत हलत येथे रेफर करण्यात आले आहे. एसपी आऊटर तेज स्वरूप सिंह यांनी सांगितले की, घाटमपूरच्या कोरथा गावात राहणारे ३५ हून अधिक लोक ट्रॅक्टर-ट्रॉलीने उन्नाव बक्सर घाटाजवळ चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी उशिरा सर्वजण ट्रॅक्टर-ट्रॉलीने घरी परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला.
कानपूर दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच शासनाकडून मदतीची रक्कमही जाहीर करण्यात आली आहे. अपघातातील जखमींना ५० हजार आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत