Contact Banner

असोदा रेल्वे गेट ५ फेब्रुवारी पासून वाहतुकीस कायमचे बंद होणार




असोदा रेल्वे गेट ५ फेब्रुवारी पासून वाहतुकीस कायमचे बंद होणार 

लेवाजगत न्यूज जळगाव -आसाेद्यासह नऊ गावे व यावल‎ तालुक्यासाठी उपयाेगी ठरलेले‎ आसाेदा रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद‎ करण्याचा अखेर निर्णय झाला. येत्या ५‎ फेब्रुवारीपासून रेल्वेगेटचा मार्ग‎ वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद‎ हाेईल. त्यामुळे ममुराबाद रेल्वे पूल व‎ शिवाजीनगर उड्डाणपुलावरील वाहतूक‎ १० ते २० टक्क्याने वाढणार आहे.‎ एमआयडीसीत जाणाऱ्यांसाठी सुमारे‎ दीड ते दाेन किमीचा फेरा वाढणार‎ आहे. या गेटचा दररराेज १५ ते २०‎ हजार नागरिक वापर करतात. आता‎ १३०० मीटर अंतराचा पर्यायी रस्ता‎ तयार असून त्याचा वापर हाेईल.‎ आसाेदा, भादली, शेळगाव, सुजदे,‎ भाेलाणे, देऊळगावसह यावल‎ तालुक्यातून जळगावात येणाऱ्यांसाठी‎ गेली अनेक वर्षे आसाेदा रेल्वे पुलाचा‎ पर्याय उपलब्ध हाेता; परंतु आसाेदा‎ रेल्वेगेटवर उड्डाणपुलाची निर्मिती सुरू‎ झाली आहे. पुलाचे ४० टक्केपेक्षा‎ जास्त काम पूर्ण झाले आहे. तीन‎ पिअर्स उभारणीसाठी रेल्वेगेट ५‎ फेब्रुवारीपासून कायमस्वरूपी बंद‎ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‎

    मनपाची अट पूर्ण झाली : पिंप्राळा रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी शिवाजीनगर उड्डाणपुलावरून वाहतूक‎ सुरू व्हावी, अशी अपेक्षा मनपाने व्यक्त केली हाेती. त्याचप्रमाणे आसाेदा रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी बाह्यवळण‎ रस्ता तयार करून मिळावा, अशी अट घातली हाेती. त्यानुसार महारेलने मक्तेदारामार्फत साडेसात मीटर‎ रुंदीच्या डांबरी रस्त्याची निर्मिती केल्याने मनपाने आॅगस्ट २०२२मध्ये दिलेल्या पत्रानुसार मागणी पूर्ण झाली.‎

    एमआयडीसीत जाणाऱ्यांचा वेळ वाढणार‎ 

आसाेदासह ग्रामीण भागातून एमआयडीसी अथवा‎ कालिंकामाता मंदिराकडे जाणाऱ्यांसाठी आसाेदा‎ रेल्वेगेटचा पर्याय साेईचा ठरत हाेता; परंतु गेट बंद‎ झाल्याने वाहनधारकांना ममुराबाद उड्डाणपूलमार्गे शनी‎ मंदिराकडून प्रवास करावा लागेल. यामुळे दाेन किमीचे‎ अंतर वाढेल. आसाेदाकडून येणाऱ्यांना ममुराबाद‎ पुलासह शिवाजीनगर उड्डाणपूल व सुरत रेल्वेगेट असे‎ तीन पर्याय शहरात दाखल हाेण्यासाठी उपलब्ध आहेत.‎

    तीन पिअर्सच्या कामांना येणार गती‎ 

उड्डाणपुलाच्या कामासाठी १० पिअर्सची उभारणी‎ केली जाणार आहे. त्यापैकी सात पिअर्सचे काम‎ पूर्णत्वाकडे आले आहे. ‘एस’ आकाराच्या‎ उड्डाणपुलासाठी तीन पिअर्सची रेल्वेगेटच्या दाेन्ही‎ बाजूने लागून हाेणार आहे. गेटच्या मध्यभागी‎ उभारणी हाेणार असल्याने गेट बंद करावे लागत‎ आहे. गेट बंद हाेताच मिरर इन्फ्रास्ट्रक्चर या‎ कंपनीकडून कामाला सुरुवात हाेईल.‎

    दिवसभरात बसेसच्या ५० फेऱ्या‎

आसाेदा, देऊळवाडा, सुजदे, भाेलाणे, भादली‎ आदी गावांसाठी दिवसभरात ५० पेक्षा जास्त‎ बसेसच्या फेऱ्या हाेतात. बसेसच्या माध्यमातून‎ दिवसभर ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्याची‎ ये-जा सुरू असते. शिवाय नाेकरदार,‎ व्यावसायिकांकडून खासगी वाहनांचा वापर‎ हाेताे. २४ तासांत रेल्वेगेट २४० वेळा बंद हाेते.‎ त्यामुळे सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत‎ वाहतुकीचा वेग अधिक असल्याने वाहतुकीचा‎ खाेळंबा हाेताे. दिवसभरात या रेल्वेगेटने सुमारे‎ १५ ते २० हजार नागरिक ये-जा करतात.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.