सावदा भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची कामे रडखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी कशासाठी करतात अधिकारी दिरंगाई याचा तपास घेणे आवश्यक
सावदा भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची कामे रडखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
कशासाठी करतात अधिकारी दिरंगाई याचा तपास घेणे आवश्यक
लेवाजगत न्यूज सावदा:- सावदा भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांच्या महत्त्वाच्या कामांना वारंवार दिरंगाईचा सामना करावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कार्यालयामध्ये काही प्रॉपर्टी धारकांचे प्रॉपर्टी धारक कार्डवर नाव वेगळे व ऑनलाईन नाव वेगळे तर काहींचे नाव बरोबर आहे तर घर नंबर वेगळे असल्याने नागरिकांची यामुळे सुद्धा कुचंबना होत आहे. याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन यासाठी नागरिकांच्या सोयी करतात सावदा येथे कॅम्प लावावा अशी मागणी ही नागरिक करीत आहे.अनेक नागरिकांनी आपल्या शेतजमिनी, प्लॉट्स, व वारस नोंदणीसंबंधीच्या कामांसाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवले तरीही त्यांच्या कामांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
कार्यालयीन चुकी व नागरिकांना मनस्ताप
भूमि अभिलेख कार्यालयामध्ये आधी प्रॉपर्टी कार्ड होते ते प्रॉपर्टी कार्ड नुसार ऑनलाईन उताऱ्या वरती त्यांचे घर नंबर व नोंदी त्याचप्रमाणे पाहिजे होते पण कार्यालयाच्या दुर्लक्ष ते मुळे काही प्रॉपर्टी धारकांचे नावे व घर नंबर चुकीची असल्याने नागरिकांना विनाकारण भुर्दंड व मनस्ताप होत आहे .तरी याकरिता वरिष्ठ प्रशासनाने लक्ष देऊन सावदा परिसरासाठी दुरुस्तीचा कॅम्प लावावा जेणेकरून नागरिकांना होणारा भुर्दंड टळेल. प्रॉपर्टी कार्ड धारकांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन आपल्या नोंदी बरोबर आहे का नाही हे तपासून बघावे अन्यथा आपणास ऐनवेळी त्रास सहन करावा लागेल.
या कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती सामान्य झाली असून, कोणत्या दिवशी कोण हजर असेल, याबाबत नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे वेळ व पैसा दोन्ही वाया जात आहे. काही प्रकरणे महिनोनमहिने प्रलंबित असून, ती का प्रलंबित आहेत याची माहिती देण्यासही अधिकारी टाळाटाळ करतात.
सावदा शहरातील तसेच परिसरातील अनेक नागरिक आपल्या मालमत्तेच्या नोंदी, फेरफार, वारसनोंदी यांसारख्या कामांसाठी कार्यालयाकडे येत असतात. मात्र कार्यालयातील दिरंगाईमुळे त्यांचे काम लांबणीवर पडत असल्याने संतप्त नागरिकांनी याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे. नागरिकांची कामे वेळेवर पूर्ण न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागू शकतो असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
गेल्या महिन्यापूर्वी रावेर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीत सर्व विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देखील तांदलवाडी येथील नागरिकांनी सावदा भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख यांच्याशी मोठा आर्थिक व्यवहार करून देखील वेळेवर काम करत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु तरीदेखील या अधिकाऱ्याला कोणतेही सोयरा सुतक दिसत नाही. किंवा या कार्यालय प्रमुखावर कुण्या उच्च अधिकाऱ्याचा हात तर नाही ना या निमित्ताने शंका उपस्थित होते.
या कार्यालयात या अनेकदा काम करण्यासाठी अर्ज केल्यावर ज्या कामासाठी अर्ज केला आहे ते न होता जास्तीचे किंवा दुसरेच नोंद वा काम होते. त्यामुळे अनेकदा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही कामे येथील अधिकारी कशासाठी करतात ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जास्तीची झालेली नोंद वा कमी झालेली नोंद दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना पुन्हा या कार्यलयाच्या महिनो न महिने चकरा माराव्या लागतात व अशा वेळी येथे अनेकदा आर्थिक देवानाघेवान केल्याशिवाय ही कामे होत नाही. त्यामुळे यासाठीच अशा चुकीच्या नोंदी येथील अधिकारी व कर्मचारी टाकतात का असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकात उपस्थित होत आहे.
पाच महिन्यांपासून मारतोय चकरा
मी एका दस्तावर अज्ञान पालक करता ही दोन भावांच्या नावावरून नोंद होती. त्यातील एक भाऊ सज्ञान झाला. त्यामुळे अज्ञान पालन करता ही नोंद कमी करण्यासाठी अर्ज केला होता. परंतु सावदा येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख यांनी दोघे भावांना सज्ञान दाखवले. मी पुन्हा त्यांच्याकडे अर्ज करून यातील एकच बालक सज्ञान आहे व त्याच्याच नावावर नोंद करण्यात यावी असा विनंती अर्ज दिला परंतु पाच महिन्यापासून फक्त भूमी अभिलेख कार्यालयाच्या चकरा मारत आहे. परंतु अद्याप माझे कोणतेही काम होत नाही.
- दत्तात्रय महाजन, माजी उपनगराध्यक्ष, सावदा
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत