Contact Banner

“विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही” – आ. अमोलभाऊ जावळे वड्री–परसाळे ते यावल रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात


vikasachya-babatit-kontihi-tadjod-keli-janar-nahi-a-amolbhau-jawale-vadri-parsale-te-yawal-rasta-bhumipujan-utsahat


 “विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही” – आ. अमोलभाऊ जावळे

वड्री–परसाळे ते यावल रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात

लेवाजगत न्युज वड्री:-

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वड्री–परसाळे ते यावल या प्रमुख ग्रामीण रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास येत असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शेतमाल वाहतूक, शालेय विद्यार्थी तसेच रुग्णवाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत होते. आता या रस्त्याच्या विकासामुळे वाहतूक सुलभ होणार असून हा मार्ग परिसरासाठी एक महत्त्वाची जीवनवाहिनी ठरणार आहे.

या रस्त्याच्या कामासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या कामासाठी आवश्यक निधी मंजूर झाला असून भूमिपूजनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विकासकामास सुरुवात झाली आहे.

या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, युवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते. दादाजी धुनीवाले पांडुरंग महाराज, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, नारायण चौधरी, हर्षल पाटील, राकेश फेगडे, उज्जेनसिंग राजपूत, सविता भालेराव, मुमताज फत्तु तडवी, भास्कर बाविस्कर, प्रभाकर सोनवणे, अतुल भालेराव, मीनाताई भिरूड, सागर कोळी, पंकज चौधरी, अजय भालेराव, ललित चौधरी, तेजस पाटील, भरत पाटील, श्याम महाजन, प्रल्हाद चौधरी, ललित कोळी, तुषार चौधरी, ज्ञानेश्वर तायडे, संजय कोळी, भगवान पाटील, राजू सूर्यवंशी, कन्हैया वारके, इकबाल तडवी, आशिष मोरे, शशिकांत महाजन, उमाकांत पाटील, सिद्धांत मोरे, संदीप कोळी, शेखर कोळी, दीपक कोळी, पवन बोरोले, राहुल कोळी, सचिन फेगडे, राजू कोळी, संजय मोरे, विठ्ठल सूर्यवंशी, धनराज कोळी यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बोलताना आमदार अमोलभाऊ जावळे म्हणाले, “प्रत्येक सामान्य नागरिकाला दिलासा मिळावा आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” त्यांच्या या ठाम भूमिकेचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.