नायगाव येथील साळुंखाबाई पाटील यांचे निधन
नायगाव येथील साळुंखाबाई पाटील यांचे निधन
यावल (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी साळुंखाबाई लक्ष्मण पाटील (वय ७९) यांचे अल्प आजाराने मंगळवार, दि. २४ जून २०२६ रोजी पहाटे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा विजय लक्ष्मण पाटील, सुना, नातवंडे तसेच मोठा परिवार आहे. त्या नायगाव येथील विजय लक्ष्मण पाटील यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या निधनामुळे नायगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या अंत्यसंस्कारास नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी भावना व्यक्त केली जात आहे. 🙏🕯️




कोणत्याही टिप्पण्या नाहीत