तर भारताचा १९६२ पेक्षाही भयानक पराभव होईल, चीनची भारताला पुन्हा धमकी...?
तर भारताचा १९६२ पेक्षाही भयानक पराभव होईल, चीनची भारताला पुन्हा धमकी...?
नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये सीमेवर असलेला तणाव लष्करी आणि कूटनीतीक चर्चेतून मिटवण्यावर भारताचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे चिनी मीडियाकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. भारताने देशातील राष्ट्रवाद नियंत्रणात आणला नाही तर १९६२ च्या युद्धात झालेल्या पराभवापेक्षाही वाईट स्थिती भारताची होईल, अशी धमकी चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून देण्यात आली आहे.दोन्ही देशांमधील तणाव वाढला तर भारताला १९६२च्या युद्धापेक्षाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल. भारताशी युद्ध करण्याला चीनने कधीच प्राधान्य दिलं नाही. यामुळे भारतीय सीमेवर सैनिक कमी संख्येत तैनात आहेत. पण तिथे तणाव वाढला तर चिनी सैन्य भारतीय सैन्याला प्रत्येक पातळीवर भारी असेल, अशी दर्पोक्ती ग्लोबल टाइम्समधून करण्यात आली आहे.
- भारतीय सैन्याला गोळीबाराची खुली सूट
गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधी आक्रोश आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या कोणत्याही कारवाईविरोधात जशाच तसे उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला खुली सूट दिली आहे. चीनच्या कोणत्याही कारवाईनुसार उत्तर देण्याची सूट या पूर्वी देखील देण्यात आली होती. मात्र, चीनच्या प्रत्येक कारवाईला उत्तर देण्यासाठी लष्कराने आता तयार राहावे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
- पूर्व लडाखमध्ये सीमेवर तणाव
पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैन्यात गेल्या अनेक आठवड्यांपासून तणाव आहे. त्यात गलवान खोऱ्यात १५ जूनला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. तर चीनचे अनेक मारले गेले. पण चीन मारले गेलेल्या सैनिकांचा आकडा लपवत आहे. ही माहिती जाहीर करत नाहीए.
- भारतीय सैन्याला अलर्ट
लडाखमधील हिंसक घटनेनंतर चीनला लागून असलेल्या ३५०० किलोमीवर सीमेवरील भारतीय लष्कराच्या सर्व आघाडीच्या चौक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच हवाई दल आणि नौदलालाही अलर्ट केलं गेलं आहे. हिंदी महासागरात नौदलाला सतर्क केलं गेलं आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत