विठ्ठला - कवी डॉ.सुशिल सातपुते,
विठ्ठला,पेरणे पेक्षा पोसणे जड झाले,
दुष्काळास , गारपीठीत तडजोड झाले
मग जळतो जीव अन् आठवतो घाम,
उगवुनही भावापुढे काडीमोड झाले
पेरले बियास उगवणे धास्तीत गेले
ते मात्र पोकळ घोषणेच्या मस्तीत गेले
विठ्ठला!भय नाही शिवारास पाखरांचे
दाणे रोग कीड्याच्या वस्तीत जन्मले..
विठ्ठला ! लेकरांच्या फिची घाई
मग मीही घोषणेच्या मस्तीत आलो
दाखवुन माझ्या बोटावरची शाई
आश्र्वासनाच्या शिस्तीत घेऊन गेलो...
विठ्ठला! माझ्या लेकरांत हुशारी आली
शेती नको शहराची मजुरी परवडली
मी म्हणालो, लेकरा हे सार सोसतो
अन्नदाता हाय साऱ्या जगास पोसतो...
विठ्ठला ! निसर्गाशी लढत असलो जरी
कधी चुकली नाही पंढरीची वारी
विठ्ठला ! पावसासाठी तु धाव रे ...
निसर्ग बनुन अन्नदात्याला पाव रे ..
---- डॉ.सुशिल सातपुते,गातेगाव,लातुर
सहा.प्राध्यापक, एमजीएम
नानासाहेब कदम कृषि महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद
मोबा. नं-9405733112/9404723112
कोणत्याही टिप्पण्या नाहीत