चार भाऊ बहिणीची हत्येने जिल्हा हादरला
चार भाऊ बहिणीची हत्येने जिल्हा हादरला
रावेर प्रतिनिधी-शहर पासून रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निघृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार आज दि १६ राजी सकाळी उघडकीस आला .या हत्येमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे .यात मुलींचा समावेश आहे .घटनास्थळी रावेर पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे .सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , रावेर शहरालगत काही अंतरावरील बोरखेडा शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या काही वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत शेतात राहतात .मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात .त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते .दरम्यान दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते .चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्ती कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली . दि १६ रोजी सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले .घरात डोकावून पाहिले असता .चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला . घरात गाढ झोपलेल्या कु.सविता ( वय १४ ) , राहुल ( वय ११ ) , अनिल ( वय ८ ) व नाणी ( वय ५ वर्षे ) या चौघा जणांची हत्या झाली.
हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली .मयतामध्ये दोन मुलींचा समावेश आहे .
घटनेची माहिती मिळताचा विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे . यावेळी पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे , सपोनि शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे . नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप कळू शकले नाही .
जळगाव येथून श्वान पथक घटना स्थळाकडे रवाना झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत