Contact Banner

दोन्ही लेकरांना वडापाव खाऊ घातला अन् मुलांसह रेल्वेसमोर बापाने घेतली उडी, जळगावातील ह्रदयद्रावक घटना


 दोन्ही लेकरांना वडापाव खाऊ घातला अन् मुलांसह रेल्वेसमोर बापाने घेतली उडी, जळगावातील ह्रदयद्रावक घटना

 जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पूजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.

लेवाजगत न्यूज:- जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका २७ वर्षीय तरूणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह (commits suicide) धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या आणि चार वर्षांच्या मुलीसह या तरुणाने जीवन यात्रा संपवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील नगरदेवळा रेल्वेस्थानकावर ही घटना घडली.  जितेंद्र दिलीप जाधव असं या बापाचे नाव आहे.  चिराग नावाचा ६ वर्षाचा मुलगा व खुशी नावाची ४ वर्षाची मुलगी असे तिघे मयतांची नावे आहे.

   चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पूजा आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. चाळीसगाव येथील जे.जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणून काम करत होता. जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पूजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. जितेंद्र व पूजा यांच्यात भांडणं होत होती. त्यामुळे पूजाने तिचा भाऊ भुषण, काका सुधाकर व काकु यांना चाळीसगाव येथे बोलावून घेतले आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र विरोधात विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

त्यांनतर पूजाही भाऊ, काका आणि काकुंसोबत माहेरी निघून गेल्या जितेंद्र हा दोघ मुलांना सोबत घेऊन बोरखेडा येथे आपल्या मुळगावी आला होता. दरम्यान, रविवार १३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेतले व गावाबाहेर पडला.

     बोरखेडा येथील बसस्थानकावरील हॉटेलवर त्याने दोघ मुलांना वडापाव खाऊ घातले. जितेंद्र आपल्या मुलासह घरात दिसून येत नसल्यामुळे त्याच्या भावा आणि वडिलांना शंका आली. त्यांनी मुलांचा व जितेंद्र याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान त्यांनी कजगाव, वाघळीपर्यंत रेल्वेरुळ पिंजुन काढल्यानंतर ते आढळून आले नाही. तर नगरदेवळा रेल्वेस्थानकावर त्यांचे नातेवाईक नाना अहिरे हे शोध घेत असतानाच त्यांना जितेंद्र, चिराग व खुशी याचे मृतदेह आढळून आले.

   सकाळी ११ वाजता सचखंड एक्स्प्रेस धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्याने घेतले आणि उडी घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख, हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार व प्रविण वाघ यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात आत्महत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे बोरखेडा गावी मोठी शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.