Header Ads

Header ADS

अट्रावलच्या गुराख्यांची शेतकऱ्याला मारहाण

 

Atraval's-herdsmen-beating-the-farmer

अट्रावलच्या गुराख्यांची शेतकऱ्याला मारहाण प्रतिनिधी | यावल तालुक्यातील अट्रावल शिवारात केळीच्या बागेत बकऱ्या का घातल्या ? अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला अट्रावल येथील दोन गुराख्यांनी मारहाण केली. पिकाचे नुकसान केले. दोघांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

Atraval's-herdsmen-beating-the-farmer


अट्रावल शिवारात गट क्रमांक ८२७ व ८११ मध्ये यावल शहरातील महाजन गल्लीतील शेतकरी निर्मल नथू चोपडे यांनी केळी लागवड केली आहे. त्यांच्या केळी बागेत सागर मानोकर व नामदेव कोळी (दोघे रा. अट्रावल ) यांनी अनधिकृतपणे बकऱ्या घालून नुकसान केले. त्यांना जाब विचारला असता दोघांनी निर्मल चोपडे व सोबतचे सागर इंगळे यांना मारहाण केली. ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निर्मल चोपडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.