Header Ads

Header ADS

सावदा शहरात साई पार्क परिसरात अमृत पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनमुळे चिखलाचे साम्राज्य!नागरिक त्रस्त

 

Citizens suffer due to mud empire due to pipeline of Amrit water supply scheme in Sai Park area of ​​Savda city


सावदा शहरात साई पार्क परिसरात अमृत पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनमुळे चिखलाचे साम्राज्य!नागरिक त्रस्त


लेवाजगत न्यूज सावदा- शहरात केंद्रशासन पुरस्कृत अमृत २.० योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असून, सध्या या कामामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पाइप लाइन टाकण्यासाठी करण्यात आलेले रस्त्यांचे खोदकाम पावसात चिखल युक्त झाले असून, त्यातून नागरिकांचे पायी चालतानाही हाल व अपघातांच्या घटनांमध्ये वाढ़ होत आहे.





शहरातील मुख्यत्वे साई पार्क,सुगंगा नगर,सोमेश्वर नगर,निमजाय मत नगर या नवीन कॉलनी परिसरात खड्डे उघडेच असून, रात्रीच्या वेळी विजेचा अभाव आणि चिखल यामुळे नागरिक घसरून पडत असून, काही जण गंभीर जखमी देखील झाले आहेत.  चार चाकी वाहन धारक सुद्धा अश्या भागात गाडी नेण्यास विचार करत असल्याने दुचाकी वाहन धारकाचे काय.. 

    यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या असय्य समस्येबाबत मुख्याधिकारी भूषण वर्मा व बांधकाम अभियंता ,पाणीपुरवठा अभियंता यांनी परिसराला भेट देऊन तात्काळ अश्या ठिकाणी मुरूम टाकून योग्य ती उपाय योजना करण्याची मागणी केली नागरिक करीत आहे. 

या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक यांच्या मान्यतेनुसार १५ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, २.७० लाख लिटर क्षमतेच्या उंच जलटाकीचे बांधकाम, मुख्य पाइपलाइन टाकणे व घरोघरी पाणीपुरवठा योजनेसाठी काम सुरू आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, पाईपलाईनच्या चारीवर मुरूम टाकण्याचे काम सुरु  करण्यात आले आहे.पण साई पार्क,सुगंगा नगर,निमजाय माता नगर ,सोमेशवर नगर या परिसरात पण  लवकरच या परिसरात मुरूम टाकून नागरिकांची गैरसोय दूर करावी.

पाईप लाईन खोद कामाच्या वेळी वरच्या मातीच्या थरामुळे रस्त्यांवर चिखल साचला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाले असून, नगरपरिषदेकडे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यावर पालिकेने काम करणाऱ्या लक्ष्मी कन्स्ट्रकशन कंपनीला नोटीस बजावली असून, काम वेळेत पूर्ण न झाल्यास पालिके मार्फत मुरूम टाकून रस्त्यांची डागडुजी करून त्याचा खर्च ठकेदाराच्या देवकातून वसूल केला जाईल. असे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी सांगितले.

   तरीपण या नवीन कॉलनी परिसरात तत्काल मुरूम टाकून तात्पुरती का होईना नागरिकांचे सोय करून द्यावी अशी मागणी महिला वर्ग सह नागरिक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.