स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ अभ्यास नव्हे, तर सखोल समज आणि सातत्यपूर्ण मेहनत गरजेची : बबनराव काकडे
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ अभ्यास नव्हे, तर सखोल समज आणि सातत्यपूर्ण मेहनत गरजेची : बबनराव काकडे
अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते बबनराव काकडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
भुसावळ | लेवाजगत न्यूज प्रतिनिधी
“स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर केवळ पुस्तकी अभ्यास पुरेसा नसून विषयाची सखोल समज, सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. सुरुवातीलाच अवघड वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास केल्यास आत्मविश्वास वाढतो. मागील प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण केल्याने परीक्षेचा नेमका अंदाज येतो,” असे प्रतिपादन यांनी केले.
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे दि. २१ रोजी भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी (ता. यावल) येथे माजी खासदार तथा आमदार, कृषीमित्र व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘पुष्पांजली प्रबोधनमाला’ कार्यक्रमातील तृतीय पुष्प त्यांनी गुंफले. ‘स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यंदा या प्रबोधनमालेचे आठवे वर्ष आहे.
ते पुढे म्हणाले की, १०वी–१२वी नंतर कोणत्याही क्षेत्रात प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावेच लागते; त्यामुळे स्पर्धेची मानसिक तयारी आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार अभ्यासाचे तास निश्चित करावेत. वरवरचा अभ्यास करून यश मिळत नाही. परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे योग्य नियोजन, उत्तरपत्रिकेतील निटनेटकेपणा, स्पष्ट मांडणी आणि योग्य भाषा-शैली याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
व्यक्तिमत्त्व विकासासाठी अवांतर वाचनाची सवय लावणे गरजेचे असून, जितके अधिक वाचन तितकी वैचारिक समृद्धी वाढते. केवळ बुद्धिमत्तेपेक्षा सातत्य, चिकाटी आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर अधिक महत्त्वाचा ठरतो. सातत्याने केलेला अभ्यास व प्रयत्नच खरे यश मिळवून देतात, असा सल्लाही त्यांनी दिला.
“ज्या क्षेत्रात करिअर कराल त्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास ठेवा. अपेक्षित यश मिळाले नाही तरी पर्यायी ‘प्लॅन बी’ तयार ठेवा. प्रत्येक दिवस नवी सुरुवात आहे. अपयशातून शिकत नव्या जोमाने पुढे चला. छंद जोपासल्यास जीवन अधिक आनंदी व समृद्ध होते,” असा गुरुमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन होते. यावेळी मुख्याध्यापक विजय वारके, उपमुख्याध्यापक संगीता फिरके, समन्वयक चंद्रकांत सूर्यवंशी, सहसमन्वयक ललित महाजन उपस्थित होते. प्रबोधनमालेसाठी , चे यजुर्वेंद्र महाजन आणि जळगावचे उद्योजक यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन ललित सुपे यांनी केले तर आभार जयंत चौधरी यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील तसेच भारत विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत